शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, "मै बागी हूँ'

File photo
File photo

यवतमाळ : "चुकीचे धोरण, निर्णय या विरोधात मी आवाज उठविला. त्यामुळे मला "बागी' म्हटले गेले. देश व नागरिक यांच्या हितासाठी खरे बोलणे चुकीचे असेल, तर "मै बागी हूँ', अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप सरकारच्या अनेक धोरणांवर चौफेर हल्ला चढविला.
यवतमाळ येथील शिवशक्ती लॉन येथे गुरुवारी (ता.17) कॉंग्रेसचे यवतमाळ विधानसभेचे उमेदवार बाळासाहेब मांगूळकर यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत सिन्हा बोलत होते. ते म्हणाले की, "राज्यातच नव्हे, तर देशात एक प्रकारची दादागिरी सुरू आहे. दररोज एक नवीन कायदा आणून सामान्य जनतेस वेठीस धरण्यात येत आहे. "जीएसटी'मुळे अनेक व्यवसाय उद्‌ध्वस्त झाले असून, तरुणांच्या नोकरीच्या संधी कमी झाल्या, अनेकांचे रोजगारही यामुळे हिरावले गेले असल्याचा आरोपही सिन्हा यांनी भाजपवर केला. देशात भूकमारी वाढली आहे, उद्योगधंदे बंद पडत आहेत. मात्र, यावर कुठलीच वाच्यता केली जात नाही. बालाकोट, सर्जिकल स्ट्राईक, कलम 370 यावरच भाजपचा भर असल्याची टीकाही सिन्हा यांनी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वझाहत मिर्झा, राहुल ठाकरे आदी उपस्थित होते.

पंतप्रधानांवर टीका
हमारे "मित्र' रातोरात कुठलीही चर्चा न करता, कोणालाही विश्‍वासात न घेता निर्णय घेत आहेत. या निर्णयाचा परिणाम देशातील युवापिढीवर झाला आहे. नोटाबंदीनंतर काळे धन बाहेर आले नाही. त्याचा परिणाम उद्योगधंद्यांवर झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट उल्लेख न करता त्यांच्यावर "शॉटगन' यांनी हल्ला चढविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com