कापसानंतर सोयाबीन सात हजारांवर

शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक होणार आहे
सोयाबीन
सोयाबीनsakal

यवतमाळ : यंदा कापसानंतर सोयाबीनचे दर वाढत आहेत. यंदा सोयाबीनला चांगले दर मिळत आहेत. कापसाचे दर सात हजारांवर गेलेले आहेत. दर वाढलेले असले तरी शेतकऱ्यांकडील सोयाबीन कधीचेच संपले आहे. त्यामुळे या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक होणार आहे.

यावर्षी कापसाचे भाव नवनवे उच्चांक गाठत आहेत. कापसाच्या भावाने पुन्हा उसळी घेतली आहे. कापसाला तब्बल १२ हजार रुपये प्रतिक्विंटल असा ऐतिहासिक बाजारभाव मिळाला आहे. असे असले तरी, या विक्रमी बाजारभावाचा फायदा फारच कमी शेतकऱ्यांना मिळत असल्याचे नजरेस पडत आहे. छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आपल्या जवळचा साठवलेला कापूस कधीच विक्री करून टाकला. आता ज्या शेतकऱ्यांकडे थोडाफार कापूस शिल्लक आहे, ते शेतकरी सधन आहेत. त्यामुळे या विक्रमी दराचा फायदा सधन शेतकऱ्यांना व कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच होत असल्याचे बाजारपेठेतील चित्रावरून दिसत आहे.

कापसानंतर आता सोयाबीनच्या दरातही चांगली वाढ झाली आहे. सोयाबीनचे दर सात हजारांवर पोहोचले आहेत. अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाल्यामुळे दर वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढल्याने मागणी व पुरवठा यामध्ये तफावत निर्माण झाली. त्यामुळेच विक्रमी दर मिळत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com