कापूस, सोयाबीनसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना रस्त्यावर

कापूस, सोयाबीनसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना रस्त्यावर

संग्रामपूर: कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुक्यातील वरवट बकाल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. आज शनिवारी (ता.20) संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून रस्ता अडवून धरला आहे.

या मध्ये शासन विरोधी घोषणा दिल्या जात आहेत. सोयाबीन आणि कापुस हमी भाव जाहीर करून शेतकऱयांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. ऑनलाईनच्या गोंधळामुळे मागील वर्षी जे शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहले. त्यांना 50 टक्के पिकविम्याची रक्कम देण्यात यावी. अशा मागण्या घेऊन स्वाभिमानीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. वरवट बकाल या मध्यवर्ती ठिकाणी 7 वाजता पासून घोषणा देत वाहने अडविण्यात आले आहेत. रस्त्यावर टायर जाळण्यात येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com