वाघांच्या मृत्यूबाबत गैरसमजच अधिक

वाघांच्या मृत्यूबाबत गैरसमजच अधिक

नागपूर : वाघ वाचले पाहिजे ही सरकराची भूमिका आहे. मात्र, वाघांच्या मृत्यूबाबत गैरसमजच अधिक पसरविले जात आहेत. अलीकडे मृत पावलेल्या बहुतांश वाघांचा मृत्यू नैसर्गिकच झाल्याचा दावा वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. वन्यप्राण्यांमुळे शेतमालाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरापाई देण्यासाठी कायदा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
"युथ एम्पॉरमेंट समिट' कार्यक्रमात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अलीकडे मृत झालेल्या वाघांपैकी चार वाघ हे नागपूरच्या रेस्क्‍यू सेंटरमधील होते. तीन वाघ ट्रेनखाली आलेत. वाघांचे वय साधारणत: 12 ते 15 वर्षे असते. त्यापेक्षा जास्त काळ जगू शकत नाहीत. वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी काही शेतकरी कुंपनात वीज प्रवाह सोडतात. त्यामुळेसुद्धा वन्यप्राणी मारले जातात. हे थांबविण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष पाऊल उचलण्यात येत आहे. वन्यप्राण्यांपासून शेतीचे नुकसान होत असल्यास 15 दिवसांत नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार कायदा करीत आहे. यासाठी वन अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या जात असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
नोट छपाईचे धोरण असते ठरले
दोन हजारांच्या नोटांच्या छपाईत केंद्र सरकारने कपात केलेली नाही. कुठल्या आणि किती नोटा छापायच्या याचे धोरण ठरले असते. गरजेनुसार त्या छापल्या जात नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com