पोलिस, वन कर्मचाऱ्यांवर हल्ला 

Attack-on-Police
Attack-on-Police

अकोट - प्रतिबंधित वन क्षेत्रामध्ये आठ दिवसांपासून अवैधपणे घुसून तेथे ठाण मांडणाऱ्या पूनर्वसित आदिवासी बांधवांनी मंगळवारी (ता. 22) पोलिस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला चढविला. यामध्ये पोलिस व वन विभागाचे 28 कर्मचारी जखमी झाल्याची घटना झाली. तसेच, आदिवासी बांधवांनी वनामध्ये जावून जाळपोळ सुरू केली आहे. जंगलातील कुरण पेटविण्यात आले आहे. 

माणसी पाच एकर शेती द्या किंवा आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या, यांसह इतर मागण्यांसाठी वन विभागातून पूनर्वसीत करण्यात आलेल्या आदिवासी बांधवांनी अकोट वन्यजीव विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात सोमवारी (ता. 14) अवैधपणे प्रवेश केला. या आदिवासींनी प्रवेश करताना खटकाळी येथील प्रवेश दाराची तोडमोड केली होती. तसेच, यामध्ये तीन वनरक्षकांना किरकोळ जखमी केले होते. गेल्या दहा दिवसांपासून वन विभागात अवैधपणे ठाण मांडून बसलेल्या आदिवासींना समजाविण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा कामाला लागली आहे. 

मंगळवारी (ता. 22) दुपारी वनविभागाचे वनरक्षक आणि पोलिस केलपाणी येथे अवैधपणे रहिवासी असलेल्या आदिवासींना बाहेर काढण्यासाठी गेले. वनरक्षक व पोलिसांची संख्या सुमारे 400 होती. आदिवासींशी चर्चा सुरू असतानाच पोलिस व वनरक्षकांवर प्रथम दगडांचा वर्षाव करण्यात आला. नंतर डोळ्यांमध्ये मिरची पावडर फेकण्यात आली. लाठ्या-काठ्या, कुऱ्हाडी आणि दगडांचा मुक्त वापर करण्यात आला. यामध्ये 28 कर्मचारी गंभीर जखमी झाले. 

घटनेची माहिती मिळताच भारिप-बमसंच्या अंजलीताई आंबेडकर, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, माजी सभापती रामदास मालवे यांनी जखमींची भेट घेवून विचारपूस केली. घटनास्थळी पोलिस ताफा वाढविण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात जमाव बंदीकरिता कलम 144 लागू करण्यात आले आहे.

पोलिसांसह वनरक्षकांवर हल्ला 
मंगळवारी (ता. 22) दुपारी वनविभागाचे वनरक्षक आणि पोलिस केलपाणी येथे अवैधपणे रहिवासी असलेल्या आदिवासींना बाहेर काढण्यासाठी गेले. वनरक्षक व पोलिसांची संख्या सुमारे 400 होती, असे वन अधिकाऱ्याने सांगितले. आदिवासींशी चर्चा सुरू असतानाच पोलिस व वनरक्षकांवर प्रथम दगडांचा वर्षाव करण्यात आल्याचे एका जखमी जवानाने सांगितले. नंतर त्यांच्या डोळ्यांमध्ये मिरची पावडर फेकण्यात आली. लाठ्या-काठ्या, कुऱ्हाडी आणि दगडांचा मुक्त वापर करण्यात आला. यामध्ये वनरक्षक व पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना अकोला येथे पाठविण्यात आले. 

घटनेची माहिती मिळताच भारिप-बमसंच्या अंजली आंबेडकर, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, माजी सभापती रामदास मालवे यांनी जखमींची भेट घेवून विचारपूस केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com