हंगाम संपताच तुरीचे दर वधारले

Tur
Tur

अमरावती - तुरीच्या स्थिर दरात सरासरी दोनशे ते अडीचशे रुपयांनी वाढ झाली आहे. स्थानिक बाजार समितीत तुरीचे कमाल दर ५ हजार ४५० रुपयांवर पोहोचले आहेत. वाढीव दराचा लाभ मात्र शेतकऱ्यांच्या पदरी किती पडेल, हा प्रश्‍न आहे. सरासरी पाच ते सहा हजार रुपये भाव असलेल्या तिळाचे दर कडाडले असून, ते अकरा हजारांवर गेलेत.

काही वर्षांपासून जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उन्हाळी तीळपेरणी सुरू केली आहे. साधारणतः मकरसंक्रांतीला तिळाचे भाव वधारतात. त्यानंतर दरात घसरण येऊन साधारणपणे सरासरी पाच ते सहा हजार रुपये प्रतिक्विंटलवर दर स्थिरावतात. यंदा मात्र तिळाच्या दरातील तेजी कायम आहे. तिळाला खुल्या बाजारात ११ हजार कमाल, तर ९ हजार ५०० रुपये किमान भाव मिळाला आहे. या तिळाचे पेरणीक्षेत्र अतिशय मर्यादित असून उत्पादनाची सरासरीही जेमतेम आहे.

तुरीचा हंगाम सुरू झाला, तेव्हा शासकीय खरेदीचे धोरण निश्‍चित झालेले नव्हते. त्याचा लाभ खुल्या बाजारातील खरेदीदारांनी घेतला. हमीदराच्या तुलनेत चांगला भाव दिल्याने शेतकऱ्यांचा लोंढा खुल्या बाजाराकडे वाढला.

हंगामात खुल्या बाजारात तुरीचे सरासरी ३ हजार ८०० ते ५ हजारांपर्यंत भाव स्थिर होते. दरम्यान बाजारात तुरीचे भाव कोसळल्याने शासकीय तूरखरेदीही हंगामात सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी आर्थिक निकडीपायी मिळेल त्या भावात तूर विकली. जानेवारीपासून तुरीच्या दरात किरकोळ वाढ होऊन कमाल दर ५,२५० वर स्थिरावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com