विदर्भात दोन युवा शेतकऱ्यांची आत्महत्या

वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील घटना; दोघेही कर्जबाजारी
Two in Vidarbha Suicide of young farmers
Two in Vidarbha Suicide of young farmers

आष्टी / चिमूर : कर्जात बुडाल्यामुळे आष्टी (जि. वर्धा) तालुक्यातील बोरखेडी व चिमूर (जि. चंद्रपूर) येथील दोन युवा शेतकऱ्यांनी शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

बोरखेडी गावातील अजय रामकृष्ण बोरजवाडे (वय २५) याच्या आजोबाची धाडी शिवारात ३ एकर शेती आहे. आजोबा वृद्ध असल्याने व वडिलांची प्रकृती सतत बिघडत असल्याने गत दोन वर्षांपासून शेती अजय वाहत होता.

गत दोन वर्षांपासून सतत नापिकी आल्याने कर्जाचा डोंगर वाढतच गेला. त्यामुळे हताश झालेल्या अजयने बोरखेडी येथील शेतशिवारात सागाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आष्टी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. चिमूर नगरपरिषद हद्दीतील वडाळा पैकू येथील सूरज उर्फ सचिन गुलाब सावसाकडे (वय २८) या युवा शेतकऱ्याने रिट टेकाळी पैकू येथील स्वतःच्या शेततील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केला. ही घटना बुधवारी (ता. ३०) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तालुक्यातील वडाळा पैकू येथील काही शेतकरी आज सकाळच्या सुमारास शेतशिवारात कामासाठी गेले होते.

या शेतकऱ्यांना शेतातील झाडाला सचिनचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत लटकताना दिसला. वृद्ध आईवडिलांचा एकुलता एक आधार असलेल्या सचिनच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सततची नापिकी, कोरोनामुळे वाढलेल्या कर्जाच्या डोंगराने नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com