विद्यापी म्हणते परीक्षा घेणारच...विद्यार्थी म्हणतात नको-नको

amaravati univarsity
amaravati univarsity

अकोला : उच्च व तंत्रशिक्षणाच्या परीक्षांचे सोयीनुसार विद्यापीठांनी नियोजन करण्याचे सूचविण्यात आल्यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासह राज्यातील सर्वच विद्यापीठांनी परीक्षांची तयारी सुरू केली आहे. मात्र विद्यार्थी संघटनांनी आरोग्याचा प्रश्‍न पुढे करीत परीक्ष घेण्यास विरोध दर्शविला आहे.


संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळातर्फे परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयातर्फे देण्यात आलेल्या निर्देशाप्रमाणे परीक्षांचे संचालन करण्यात येत आहे. मात्र अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाकडे परीक्षेसंदर्भात निर्णय जाहीर करावा किंवा किमान वेळापत्रक तरी जाहीर करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर विद्यापीठाकडून यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाकडे विचारणा करण्यात आली. त्यानंतर परीक्षांचे संचालन योग्यप्रकारे व्हावे यासाठी नियोजन करण्याचे निर्देश विद्यापीठांना देण्यात आले.


अमरावती विद्यापीठाची सहा सदस्यीय समिती
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे परीक्षांचे संचालन योग्य प्रकारे व्हावे म्हणून सहा सदस्यीय समिती गठीत केली आहे. ही समिती परिस्थितीचा आढावा घेणार आहे. या समितीशिवाय विद्यापीठ अनुदान आयोगानेही (युजीसी) कार्यकारी समितीचे गठण केले आहे. केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार परीक्षेसंदर्भातील कार्यवाही केली जाईल, असे अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी विद्यार्थी संघटनांच्या पत्राला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.


विद्यार्थी संघटनांकडून परीक्षेला विरोध
राज्यात १५ फेब्रुवारीपासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे शिकविण्याचे काम बंद आहे. ऐन परीक्षेच्या काळातच संचारबंदी लागल्याने व सर्वत्र लॉकडाउन असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा परीणाम झाला आहे. शिवाय राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अमरावती विद्यापीठाचे मुख्यालय असलेले अमरावती शहरही रेड झोनमध्ये आहे. अशा परिस्थितीत परीक्षा घेतल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणार आहे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकून परीक्षा घेणार आहेत का, असा प्रश्‍न विद्यार्थी संघटनांनी मुख्यमंत्रांना विचारला आहे.

विद्यार्थ्यांचे आरोग्य हित जोपासा
कोरोना महामारीच्या संकटात विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालून परीक्षा घेण्यात येवू नये. महाविद्यालयांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हितासाठी तातडीने घेण्यात यावा.
- आकाश हिवराळे, जिल्हा संघटक, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परीषद, अकोला 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com