उष्माघाताने घेतला शेतकऱ्याचा बळी

file photo
file photo


समुद्रपूर (वर्धा) : तालुक्‍यातील उब्दा येथील शेतकऱ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. 13) दुपारी उघडकीस आली. ताराचंद एकनाथ बुटले, असे मृताचे नाव आहे.
उब्दा येथील शेतकरी ताराचंद एकनाथ बुटले (वय 57) हे नेहमीप्रमाणे स्वत:च्या शेळ्या घेऊन रानात चरावयास गेले होते. दररोज दुपारी 12 पर्यंत ते घरी येत होते. मात्र, आज बकऱ्या घरी परतल्या, परंतु शेतकरी ताराचंद परतलेच नाही. त्यांचा भाऊ अशोक बुटले हा शोध घेण्याकरिता रानात गेला असता ताराचंद पडीक जागेवर पडून आढळला. यावेळी त्यांच्या भावाने गावातील इतर लोकांना बोलविले. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी शहानिशा केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्यांचा मृत्यू हा उष्माघाताने झाला असावा, असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. शेतकरी ताराचंद यांचेकडे साडेतीन एकर शेत जमीन असून ते शेतीसह शेळीपालनाचा व्यवसाय करीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com