वर्धा जिल्ह्यात सरासरी 60 टक्के मतदान

file photo
file photo

वर्धा : विधानसभा निवडणुकीकरिता सोमवारी (ता. 21) झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यात सुमारे 60 टक्के मतदान झाले. सायंकाळी पाचपर्यंत आर्वी मतदारसंघात 60.27 टक्के, देवळी मतदारसंघात 55.34 टक्के, हिंगणघाट मतदारसंघात 53.45 टक्के, तर वर्धा मतदारसंघात 48.07 टक्के मतदान झाले. अखेरच्या एक तासातील मतदान पकडून जिल्ह्यात सरासरी 60 टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
वर्धा मतदारसंघ वगळता इतर तीन मतदारसंघांत सुरुवातीला सकाळी चांगले मतदान झाले. वयोवृद्ध नागरिक, दिव्यांगांनी मतदानाचा अधिकार बजावला, तर नवमतदारांनी पहिल्यांदा मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात सहभाग नोंदविला. यावेळी मतदान केंद्रांवरील सोयीसुविधांमध्ये सुधारणा पाहायला मिळाली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्याकरिता खुर्च्या, मंडप आदींची व्यवस्था करण्यात आली होती.
आर्वी मतदारसंघात सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळात 62.49 टक्के पुरुषांनी, तर 57.96 टक्के महिलांनी मतदान केले. देवळी मतदारसंघात 56.94 टक्के पुरुषांनी, तर 53.63 टक्के महिलांनी मतदान केले. हिंगणघाट मतदारसंघात 55.61 टक्के पुरुषांनी, तर 51.14 टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. वर्धा मतदारसंघात 50.73 टक्के पुरुषांनी, 45.35 महिलांनी, तर 33.33 टक्के इतरांनी मतदान केले. जिल्ह्यात सायंकाळी पाचपर्यंत एकूण 56.17 टक्के पुरुषांनी, 51.68 महिलांनी, तर 28.57 टक्के इतरांनी मतदान केले.
आर्वी मतदारसंघात सकाळी सात ते नऊ या वेळात 6.48 टक्के, सकाळी नऊ ते 11 या वेळात 7.49 टक्के, सकाळी 11 ते दुपारी एकपर्यंत 19.56 टक्के, दुपारी एक ते तीन या वेळात 14.74 टक्के, दुपारी तीन ते सायंकाळी या वेळात 12.63 टक्के मतदान झाले. देवळी मतदारसंघात सकाळी सात ते नऊपर्यंत 5.73 टक्के, सकाळी नऊ ते 11 पर्यंत 11.57 टक्के, सकाळी 11 ते दुपारी एकपर्यंत 13.52 टक्के, दुपारी एक ते तीनपर्यंत 11.39 टक्के, दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळात 16.74 टक्के मतदान झाले. हिंगणघाट मतदारसंघात सकाळी सात ते नऊ या वेळात 4.27 टक्के, सकाळी नऊ ते 11 पर्यंत 6.53 टक्के, सकाळी 11 ते दुपारी एकपर्यंत 15.59 टक्के, दुपारी एक ते तीन या वेळात 14.16 टक्के, तर दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळात 6.14 टक्के मतदान झाले. वर्धा मतदारसंघात सकाळी सात ते नऊ या वेळात 5.43 टक्के, सकाळी नऊ ते 11 पर्यंत 7.87 टक्के, सकाळी 11 ते दुपारी एकपर्यंत 13.01 टक्के, दुपारी एक ते तीनपर्यंत 10.03 टक्के, तर दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळात 11.8 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सरासरी सकाळी सात ते नऊपर्यंत 5.48 टक्के, सकाळी नऊ ते 11 पर्यंत 8.36 टक्के, सकाळी 11 ते दुपारी एकपर्यंत 15.42 टक्के, दुपारी एक ते तीनपर्यंत 12.58 टक्के, तर दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळात 11.82 टक्के मतदान झाले. अखेरच्या एका तासात यात सहा ते सात टक्‍क्‍यांची भर पडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

मतदारांमध्ये उत्साह
ग्रामीण भागात मतदारांमध्ये अधिक उत्साह पाहायला मिळाला. बऱ्याच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. घरातील वृद्ध, अपंग आणि आजारी सदस्यांनाही मतदानाकरिता आणण्यात आले. निवडणूक आयोगाकडून व्यवस्थेत असलेल्या सहायकांनी वृद्ध आणि अपंग मतदारांची मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com