पाणीटंचाईच्या सभेत "पाणीहल्ला'

file photo
file photo

अमरावती : जिल्ह्यातील पाणीटंचाईचा विषय पेटला असून मंगळवारी (ता. 28) जिल्हा परिषदेने बोलाविलेल्या विशेष आमसभेत सदस्याने गटविकास अधिकाऱ्याला पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्या. या प्रकारानंतर सभेत महाभारत झाले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह विभागप्रमुखांनी सभेतून बहिर्गमण केले आणि विशेष सभा गुंडाळण्यात आली.
नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेत सभेला सुरुवात होताच गोंधळ सुरू झाला. सर्वप्रथम सदस्य गौरी देशमुख यांनी मोझरीच्या पाणीप्रश्‍नावरून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मातीचे मडके भेट देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी तो हाणून पाडला. त्यानंतर वरुड येथील पाणीटंचाईचा विषय सुरू झाला. येथील सदस्य देवेंद्र भुयार यांनी तालुकास्तरीय आढावा सभा का घेण्यात आली नाही? असा प्रश्‍न वरुडचे प्रभारी गटविकास अधिकारी सुभाष बोपटे यांना विचारला असता सभा झाल्याचे बोपटे यांनी सांगितले. त्यावर संतापलेल्या सदस्य भुयार यांनी गटविकास अधिकारी खोटे बोलत असल्याचे सांगत त्यांच्या बाकावरील पाण्याच्या दोन बाटल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या दिशेने भिरकावल्या. मात्र, सुरक्षारक्षकाच्या समयसूचकतेमुळे त्या बाटल्या अधिकाऱ्यांना लागल्या नाही. या प्रकारानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी अन्य अधिकाऱ्यांसह सभागृहातून बर्हिगमन केले. त्यानंतर अध्यक्षांनी सभा तहकूब केली. या प्रकारानंतर पोलिसांनी सदस्य देवेंद्र भुयार यांना ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com