पिण्याच्या पाण्याचे संकट दूर

पिण्याच्या पाण्याचे संकट दूर
नागपूर : मॉन्सून लांबल्याने तसेच तोतलाडोह धरणातील पाणी आटल्याने नागपूरकरांना पिण्याच्या पाण्याची चिंता लागली होती. मात्र, आठवडाभरापासून जिल्ह्यासह मध्य प्रदेशात मोठा पाऊस कोसळल्याने नागपूरवरचे पिण्याच्या पाण्याचे संकट दूर झाले आहे. सध्या तोतलाडोह धरणात 52.24 टक्के पाणीसाठा आहे.
मागील वर्षी समाधानकारक पाऊस पडला नव्हता. यातच मध्य प्रदेशात पेंच नदीवर बांधण्यात आलेल्या चौराई धरणात पाणी साठवणे सुरू झाले होते. त्यामुळे तोतलाडोह धरणात मोजकाच पाणीसाठा शिल्लक होता. यंदा मॉन्सून वेळेवर आला नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी मृत साठ्याचा वापर करण्यात आला. तोसुद्धा झपाट्याने आटला आणि जुन व जुलै महिन्यात पाऊसही फारसा आला नाही. त्यामुळे महापालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला. ही परिस्थिती नागपूरकारांवर प्रथमच ओढवली होती. पाऊस रुसला असता तर दोन दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागला असता. तशी तयारीही महापालिकेने केली होती. उन्हाळ्यापर्यंत धरण कोरडे झाले असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com