गावनिहाय सहा बोअरवेल असूनही भीषण पाणीटंचाई

ZP-Nagpur
ZP-Nagpur

७०० बोअरचे टार्गेट; ३८ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू
नागपूर - पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यात प्रत्येक गावात सरासरी सहा बोअरवेल करण्यात आल्या आहेत. तरीही ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन, तीन किलोमीटर फिरावे लागत आहे. त्यामुळे खरंच उपयोगाच्या ठिकाणी बोअरवेल होतात का, असाच प्रश्‍न उपस्थित होत आहे. तसेच पाणीटंचाई जाणवत असल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

मागील वर्षी कमी पाऊस झाला. यामुळे धरणात पाणीसाठा कमी आहे. पावसाळ्यापर्यंत हे पाणी पुरेल की नाही, याबाबत शंका आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना सद्यस्थितीत पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ३५ गावात ३८ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून विविध उपाययोजनेची आखणी करण्यात आली असून यावर ३४ कोटींच्यावर निधी खर्च करण्यात येणार आहे. यातील जवळपास आठ कोटी बोअरवेलवर खर्च होईल. यावर्षी ७०० बोअरवेलचे टार्गेट असून आतापर्यंत २५० बोअरवेल करण्यात आल्याची माहिती आहे. प्रत्येक वर्षी ७०० ते ८०० बोअरवेल जिल्हा परिषदेकडून करण्यात येते. पदाधिकारी या बोअरवेलसाठी नेहमीच आग्रही असतात. टंचाईवर मात करण्याठी बोअरवेलची मागणी त्यांच्याकडून होते. 

जिल्हा परिषदेअंतर्गत जवळपास १५५० गावे असून प्रशासनाकडून आतापर्यंत ९ हजार  बोअरवेल करण्यात आल्या आहेत. यातील ८०० बोअरवेल कायमच्या बंद करण्यात आल्या असून ८२०० बोअरवेल चालू स्थितीत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

गाव आणि बोअरवलेची संख्या लक्षात घेता प्रत्येक गावात सरासरी ६ बोअरवेल झाल्या आहेत. यावर कोट्यवधींचा खर्च झाला आहे. मात्र, त्यानंतरही बोअरवेल करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com