हजार फूट खोदूनही लागेना पाणी

Water-lavel
Water-lavel

अकोला - राज्यातील भूजलाची पातळी दिवसेंदिवस घटत आहे. अकोला जिल्ह्यात अलीकडे काही शेतकऱ्यांनी शेतात बोअर खणल्यावर एक हजार फूट खोलीपर्यंत जाऊनही पाणी लागले नाही. 

नोव्हेंबर २०१८ मध्ये भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अहवालातही भूजलपातळी मोठ्या प्रमाणावर खालावल्याचा उल्लेख होता. सरकारच्या भूजल अधिनियम २००९ मध्ये तरतूद असलेल्या गावपातळीवरील समित्या फक्त नावापुरतेच उरल्या आहेत. भूजल अधिनियमानुसार ६० मीटरच्या खाली बोअर घेता येत नाही; घेतल्यास घेणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे.

बोअर घेण्यापूर्वी भूजल सर्वेक्षण विहीर घेण्यासाठीही विभागाची परवानगी घ्यावी लागते. साधारणपणे २० ते २२ मीटर खोलीपर्यंत विहीर खोदता येते; मात्र हल्ली तीस मीटरपर्यंतच्या विहीर घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com