काय? साडेसहा हजारांत शंभर रक्तपिशव्या दूषित 

काय? साडेसहा हजारांत शंभर रक्तपिशव्या दूषित 

नागपूर : रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदानातून जीवनदान देता येते. परंतु, रक्तदानातून संकलित होणाऱ्या 6,500 रक्तपिशव्यांपैकी शंभर रक्तपिशव्या (होल ब्लड) गंभीर आजारामुळे दूषित असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेसमोर ठेवलेल्या अहवालातून स्पष्ट झाल्याचे डॉ. हरीश वरभे यांनी सांगितले. 
समाजाचे डोळे आजही रक्तदानाबाबत मिटलेलेच आहे. रक्तदानाचे प्रमाण वाढावे या हेतूने एक ऑक्‍टोबर 1975 पासून राष्ट्रीय रक्तदान दिन साजरा करण्यात येतो. 1971 सालच्या भारत आणि पाक युद्धानंतर रक्तदानासंबंधाची जागृती व्हावी या हेतूने हा दिन साजरा करण्यात येत असल्याचे डॉ. हरीश वरभे म्हणाले. रक्ताद्वारे संक्रमित होणाऱ्या आजारांचा धोका लक्षात घेता रक्त संक्रमण परिषदने "नॅट' तंत्रज्ञान विकसित केले. तसेच ज्याला रक्तातील ज्या घटकाची गरज आहे, तोच घटक द्यावा असे निर्देश संक्रमण परिषदेने दिले आहे. मात्र, "होल ब्लड' देण्याची प्रथा अद्याप सर्रास सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आठ ऑगस्ट 2016 साली राज्यसभेसमोर ठेवलेल्या अहवालातून 16 महिन्यांत 2,234 रुग्णांना अशुद्ध रक्त स्वीकारल्याने "एचआयव्हीची' बाधा झाल्याचे उघड झाले होते. मागील सात वर्षांत 14 हजार 474 रक्त स्वीकारणाऱ्यांना विविध आजार झाले होते. यामुळे गरजू रुग्णांना सुरक्षित आणि शुद्ध रक्त मिळावे, यासाठी जागृती आवश्‍यक असल्याचे डॉ. वरभे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com