कॉंग्रेसचे राजकारण स्वार्थाचे

कॉंग्रेसचे राजकारण स्वार्थाचे

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कश्‍मिरमधून 370 कलम रद्द करीत "एक भारत, श्रेष्ठ भारत'ची संकल्पना अमलात आणली. मात्र, कॉंग्रेसने अनेक वर्षांपासून डोळ्यावर पट्टी बांधली होती. लोकांमध्ये देशभक्तीचे संस्कार आवश्‍यक आहेत. मात्र, कॉंग्रेसने व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकारण केल्याचा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पश्‍चिम नागपुरात आमदार सुधाकर देशमुख तर दक्षिण नागपुरात माजी आमदार मोहन मते यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या. दक्षिण नागपुरातील तिरंगा चौकात मोहन मते यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शहर भाजपाध्यक्ष प्रवीण दटके, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार सुधाकर कोहळे, माजी महापौर व सेनेचे नेते शेखर सावरबांधे परिसरातील नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी व इतर उपस्थित होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे काश्‍मीरमधून कलम 370 हटविण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केल्याचे सांगितले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस वंशवादाला प्रोत्साहन देणारा पक्ष आहे. सत्तेत असताना गरिबांसाठी योजना, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकत होते. परंतु या पक्षांना कुटुंब महत्त्वाचे होते, असा आरोप त्यांनी केला. कॉंग्रेसकडे आज नेता नाही, धोरण नाही अन्‌ देशासाठी चांगली नियतही नाही. सत्ताकाळात कॉंग्रेसने भ्रष्टाचाराचे विक्रम केले. गरिबांच्या अधिकारावर दरोडा घातला. अशा घटना पुन्हा होऊ नये, यासाठी हीच वेळ असून त्यांना धडा शिकवा, असे नमुद करीत योगी आदित्यनाथ यांनी केंद्र सरकारने राबविलेल्या योजनांचा पाढा वाचत राज्यात विकासाची मालिका पुढेही कायम ठेवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विधानसभेत पाठविण्याचे आवाहन केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com