Fri, May 27, 2022
Video- yamini Lawhate
Video : उत्तर प्रदेशातील नागरिकांसाठी मुंबईत कार्यालय का उभारण्यात येतंय?
Published on : 11 May 2022, 2:51 pm
मुंबईत योगी आदित्यनाथ यांचं कार्यालय बनणार आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या उत्तर भारतीयांच्या हितासाठी मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय उभारण्यात येतंय. उत्तर प्रदेशातील कामगार वर्ग लाखोच्या संख्येत मुंबईत राहतो. आणि हा सर्व कामगार असंघटित आहे. त्यामुळे या कामगारांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या हक्कांसाठी योगी सरकार मुंबईत कार्यालय सुरु करणार आहे.उत्तर प्रदेशातील कामगारांना ज्या अडचणी येताहेत त्या सोडवण्यासाठी हे कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव आहे.आपात्कालीन परिस्थितीत या कार्यालयामार्फत मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांना मदतही केली जाणार आहे. पण हे कार्यालय उभारण्याची वेळ पाहिली तर आता अशी काय परिस्थिती ओढावली की अचानक योगी सरकारनं हा निर्णय घेतला ते पाहूयात.
Web Title: Why Is An Office Being Set Up In Mumbai For The Citizens Of Uttar Pradesh
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..