कलर्स मराठी वरील 'भाग्य दिले तू मला' ही मालिका सध्या बरीच चर्चेत आहे.
या मालिकेतील राज आणि कावेरी यांच्या लग्नाची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागली आहे.
राज आणि कावेरी यांचे एकमेकांवर प्रेम असतानाही कावेरीच्या हट्टामुळे आज वैदेहीशी लग्न करायला तयार होता.
पण वैदेही किती फसवी आणि खोटी आहे कावेरीला माहीत नसतं.
अखेर राज आणि वैदेही लग्नाच्या बोहल्यावर असताना कावेरीपुढे वैदेहीचा डाव लक्षात येतो.
आणि भर लग्नात जाऊन कावेरी वैदेहीच्या कानशिलात भडकावते.
आता पुढे नेमकं काय होईल, कावेरी राजचा स्वीकार करेल का? हे आगामी भागात कळेल.