कमी पाणी पित असाल तर सावधान! आजारांना निमंत्रण देताय...

सकाळ डिजिटल टीम

सामान्यत: दिवसभरातून सात ते आठ ग्लास पाणी प्यावे. तुम्ही जर शारीरिक हालचाल अधिक करत असाल तर मात्र हे प्रमाण वाढवावे.

गर्भवती महिला, सत्नपान करणाऱ्या महिलांनी मात्र नियमित पाणी प्यावे.

शरीरात पाणी कमी असल्याने शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आज आपण कमी पाणी पिण्याचे तोटे पाहणार आहोत.

कमी पाणी पिल्याने रक्तातील पाण्याचा वापर पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी करते. ज्यामुळे तुम्हाला थकवा आणि सुस्तपणा जाणवतो.

स्नायूंना पाण्याची गरज असते. कमी पाणी पिल्याने स्नायू कमकुवत होतात.

कमी पाणी पिल्यास त्वचा कोरडी पडते. मॉइश्चरायझिंग करुनही त्वचा कोरडी राहत असेल तर पाण्याची कमतरतेचे लक्षण आहे.

यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, गॅस आणि पोटाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते.

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डोळ्यांवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे डोळ्यांच्या नळ्या कोरड्या होतात.

पाण्याअभावी तोंड कोरडे पडणे ही समस्याही उद्भवते. तोंडातील बॅक्टेरिया वाढल्याने दुर्गंधी येवू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.