नीलेश अडसूळ
बॉलीवूडचे काही चित्रपट असे आहेत जे भारताच्या स्वातंत्र्यदिनी बघायलाच हवे..
देशभक्ती, सैन्य दलाचे शौर्य, वीरांचे बलीदान या माध्यमातून तसेच नव्या आशयातून देशप्रेम जागवण्याचे काम या चित्रपटांनी केले.
यामध्ये सनी देवलचा 'बॉर्डर', नाना पाटेकर यांचा 'तिरंगा', आमिर खानचा 'लगान' आणि शाहरुख खानचा 'चक दे इंडिया' हे चित्रपट देशाविषयीचा स्वाभिमान जागवणारे आहेत.
1971मध्ये भारतीय हवाई दलाच्या भुज विमानतळाचे प्रभारी असलेले स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक, अनेक आव्हानांना तोंड देत माधापूरमधील सुमारे 300 महिलांच्या मदतीने खराब झालेल्या टेक ऑफ ट्रॅकची पुनर्रचना कशी करतात यावर आधारलेला 'भुज: द प्राईड ऑफ इंडिया' हा चित्रपट भलताच गाजला.
परमवीर चक्र पुरस्कार विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित ‘शेरशाह’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कारगिल युद्धादरम्यान भारतीय जवानांचे शौर्य दाखवण्यात आले आहे.
2016 मध्ये पाकिस्तानच्या उरी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सर्जिकल स्ट्राईकवर 2019 साली आलेला 'उरी' हा चित्रपट न चुकवावा असा आहे. यामध्ये अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत होता.
मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राझी’ हा चित्रपट आलिया भट्टच्या कारकिर्दीतील महत्वाचा चित्रपट. ‘कॉलिंग सेहमत’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटात सेहमत खान या तरुण काश्मिरी मुलीची कथा आहे, जी इक्बाल सय्यद या पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याशी लग्न करून भारतीय गुप्तहेर बनून पाकिस्तानात जाते. देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सेहमतची ही कथा आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.