Narendra Modi : यातील नक्की काय काय पूर्ण झालं?

सकाळ डिजिटल टीम

भारतात सत्ताबदल होऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून विराजमान झाले.

नरेंद्र मोदींनी भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार 2022 पर्यंत दुप्पट होऊन 5 ट्रिलियन डॉलर होईल असे म्हटले होते.

मात्र, सध्या भारतीय अर्थव्यवस्था 3.5 ट्रिलियन डॉलर इतकी आहे.

२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी शेतकऱ्यांची अर्थिक स्थिती अधिक खालावल्याचे चित्र आहे.

भारतात २०२२ पर्यंत बुलेट ट्रेनचा प्रकल्प प्रत्यक्षात येईल असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओमानमध्ये भारतीयांना संबोधित करताना सांगितले होते. अद्याप हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सामान्यांना परवडणारी घरांचे वाटप करण्यात आले. मात्र, अद्यापही करोडो भारतीय त्यांच्या स्वतःच्या घराच्या प्रतिक्षेत आहेत.

२०२२ पर्यंत प्रत्येक घरात चोवीस तास वीज पुरवठा असला पाहिजे असे विधान केले होते. मात्र, आजही देशातील अनेक भागात वीज पुरवठा नियमित केला जात नाही.

भारत २०२२ पर्यंत अंतराळात अंतराळवीरांना पाठवेल असा दावा मोदींनी केला होता. मात्र वर्ष संपत आले तरी अंतराळात अद्यपपर्यंत एकही भारतीय अंतराळवीराला पाठवण्यात आलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.