Pitru Paksha 2022: पितृपक्षात या 5 पदार्थांमुळे लागू शकतो पितृदोष

सकाळ डिजिटल टीम

हिंदू धर्मानुसार घरातल्या दिवंगत व्यक्तींच्या मृतात्म्यास शांती मिळावी यासाठी श्राद्ध विधी केला जातो.

भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात म्हणजेच पितृपक्षातही पितरांना आदरांजली वाहिली जाते.

या पंधरा दिवसात हिंदू धर्मानुसार खाण्यापिण्याचेही काही नियम आहेत.

पितृपक्षात मांसाहार किंवा अंडं खाणं पूर्णपणे वर्ज्य आहे.

दारू पिणं, विडी-सिगारेट ओढणं, तंबाखू खाणं या गोष्टीही निषिद्ध मानल्या गेल्या आहेत.

जमिनीखाली तयार होणार्‍या भाज्यांचं अर्थात कंदमुळांचं सेवन या पंधरा दिवसांत वर्ज्य आहे.

कंदमुळांचा नैवेद्य दाखवणं, त्यांचं स्वत: सेवन करणं किंवा श्राद्धाच्या भोजनातही कंदमूळयुक्त भाज्या असू नयेत असं शास्त्रात सांगण्यात येत आहे.

पितृपक्षात आहार आणि आचार हा सात्त्विक असावा असं शास्त्र सांगतं.

तामसी वृत्ती म्हणजे स्वभावात तापटपणा, चिडचिड याची वाढ होऊ नये, पित्त वाढू नये यासाठी कांदा आणि लसूण यांसारखे तामसी गुण वाढवणारे खाद्यपदार्थ खाणं टाळावं.

पितृपक्षात मसूर डाळ खाणंही वर्ज्य मानलं आहे.

पितृपक्षात चणे खाणंही चुकीचं मानलं गेलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.