सकाळ डिजिटल टीम
हल्लीच्या पिढीने चाकोरीबद्ध लग्न पद्धती सोडून काळानुरूप काही बदल केले आहेत. त्यातलाच विकेंड मॅरेज हा प्रकार आहे.
या संकप्लनेचा उदय जपानमध्ये झाला आहे.
नावावरुन कल्पना आलीच असेल, यात फक्त विकेंडला कपल एकत्र येतात.
लग्नानंतर आपली स्पेस, स्वातंत्र्य गमवल्याची फीलिंग घालवणारा पर्याय म्हणून याकडे बघितले जात आहे.
जोडपं आठवडाभर वेगवेगळे राहून स्वातंत्र्य अनुभवतात, आणि विकेंड एकत्र घालवतात.
सतत एकत्र राहून वाद भांडणं वाढवून घेण्यापेक्षा लग्न टिकवण्यासाठी एकमेकांपासून लांब राहणे आणि काही काळापूरतं एकत्र येणे पर्याय स्वीकारला जात आहे.
आपलं लग्न वाचवण्यासाठी जोडपी विकेंड मॅरेजचा पर्याय निवडत असल्याचं दिसत आहे.
यामुळे जोडप्यांना भावनिक, आर्थिक स्वातंत्र्य मिळत आहे. एकमेकांसाठी ठरवून वेळ काढला जात आहे.
पण भारतात कुटुंबाभिमुख विवाह पद्धती असल्याने ही पद्धत कितपत रुजेल याविषयी सांगणं कठीण आहे असं तज्ज्ञांचं मत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.