Ravikant Tupkar: आधुनिक शेतीकडे वळा; वेळप्रसंगी हक्कासाठी भांडा...

Ravikant Tupkar : यिन वेबिनारमध्ये तरुणांना आवाहन
Ravikant Tupkar
Ravikant Tupkarरविकांत तुपकर

सकाळ वृत्तसेवा :

Ravikant Tupkar News: शेतकऱ्याला बळीराजा, अन्नदाता सारख्या उपाध्या लावल्या जातात. दुर्दैवाने सर्वाधिक आत्महत्या करण्याचे प्रमाण त्याचे आहे. हे थांबवायचे असेल तर शेतीला राष्ट्रीय उद्योग आणि शेतकऱ्यांचा व्यावसायिक म्हणून विचार केला पाहिजे.

शेतीत येणाऱ्या तरुणांनी उत्पादक होऊन चालणार नाही. शेतीआधारीत प्रक्रिया उद्योग उभे केले पाहिजे, आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे, वेळप्रसंगी हक्कासाठी भांडले पाहिजे.

असे मत वस्त्रोद्योग महामंळाचे माजी अध्यक्ष, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले. ते सकाळ माध्यम समूहाच्या ' यिन' केंद्रीय समितीसाठी शेती प्रश्नांवर आयोजित ऑनलाईन रिसर्च वेबिनारमध्ये बोलत होते.

रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहे. ते वस्त्रोद्योग महामंळाचे माजी अध्यक्ष आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन- कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्नांवर धाडसी आंदोलने करण्यासाठी ते ओळखले जातात. नुकतेच त्यांनी विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात पोलिसांच्या वेशात येऊन केलेले थकीत पीकविमासंबधीत आंदोलन राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते.

तुपकर बोलताना म्हणाले, शेती प्रश्नावर सरकार संवेदनशील असले पाहिजे. पिकाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव दिला पाहिजे. सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या पाहिजे.

जोपर्यंत शेतकऱ्यांची राजकीय व्होट बँक उभी राहत नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही. शेती सुधारणेसाठी धोरणात्मक बदल करणे गरजेचे आहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.शेतीला पूर्ण वेळ वीज, सिंचन सुविधा, शेतमालाला हमीभाव, जंगली प्राण्यांपासून सुरक्षितता दिली पाहिजे.

Ravikant Tupkar Speech
Ravikant Tupkar Speech

३० मार्च रोजी झालेला वेबिनार शेतीत संशोधनात्मक काम करणे गरजेचे

महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातील शेतीचे प्रश्न वेगवेगळे आहेत. शेती हा संशोधनात्मक अभ्यास करण्याचा विषय आहे. दुर्दैवाने शेतीत अपेक्षित संशोधन होत नाही. त्यासाठी सुशिक्षितांनी शेतीत आले पाहिजे. तेव्हाच शेतीला चांगले दिवस येतील. असे मत शेती तज्ञ, अलिगो होरायझन प्राइवेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक कापडणीस यांनी व्यक्त केले.

प्रथम सत्रात कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय सभापती दिव्या भोसले यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व परिचय यिन जिल्हा समन्वयक विष्णू नाझरकर यांनी केले. सुत्रसंचालन कृषी समिती अध्यक्ष रोहीत पाटील यांनी केले. समिती संघटक ब्रम्हानंद नकटे यांनी आभार मानले.

द्वितीय सत्रात कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती दिव्या भोसले यांनी केले. सुत्रसंचालन समिती अध्यक्ष रोहीत पाटील यांनी केले.

शेती समिती कार्याध्यक्ष सौरभ चौगुले यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com