Aarti Badade
तहान न लागता वारंवार पाणी प्यायल्याने मळमळ, अपचन आणि किडनीवर अनावश्यक ताण येऊ शकतो. शरीराचा नैसर्गिक सिग्नल ऐका.
पाचक एंजाइम्सची कार्यक्षमता कमी होते. यामुळे अन्न नीट पचत नाही आणि अॅसिडिटी होते. जेवणाच्या 15 मिनिटे आधी किंवा जेवल्यानंतर अर्धा तास पाणी प्या.
थंड पाणी पचनसंस्थेचे तापमान बदलते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे पचन आणि पोषण दोन्ही बिघडते.
उभं राहून पाणी प्यायल्याने किडनी व मूत्राशयावर वाईट परिणाम होतो. बसून शांतपणे पाणी प्या – शरीर शोषण चांगलं करतं.
अचानक जास्त पाणी पिऊन लाळ मिसळत नाही, जे पचनात मदत करतं. त्यामुळे पाणी हळूहळू आणि थोडं थोडं प्या.
रोज ८-१० ग्लास पाणी आवश्यक असलं तरी, तुमच्या वय, हवामान व शरीराच्या गरजेनुसार हे प्रमाण बदलेल.
पाणी म्हणजे जीवन. पण ते योग्य पद्धतीने पिलं, तरच त्याचे खरे फायदे मिळतात!