Pranali Kodre
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ सज्ज झाला आहे.
तब्बल आठ वर्षांनी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची शनिवारी घोषणा झाली.
निवड झालेल्या भारतीय संघाबाबत बऱ्याच चर्चा होत आहे.
दरम्यान, या संघात काही प्रचंड चर्चेत असलेल्या खेळाडूंना संघात संधी मिळाली नाही.त्यामुळे त्यांचे चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याचे स्वप्न तुटले, अशाच ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.
करुण नायरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये ७७९ धावा करत भारतीय संघाचे दार ठोठावले होते. मात्र, त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अष्टपैलू खेळाने नितीश कुमार रेड्डीने सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र, त्यालाही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यालाही भारतीय संघात संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याचेही चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याचे स्वप्न भंगले आहे.
भारताचा टी२० कर्णधार असूनही सूर्यकुमार यादवलाही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही.
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनलाही भारताच्या संघात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी स्थान देण्यात आलेलं नाही.