Aarti Badade
दिवाळी म्हटलं की मिठाई आणि गोडधोड आलंच. पण मधुमेह रुग्णांसाठी (हा मोह जीवावर बेतू शकतो आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.
Sakal
अचानक साखर वाढणे हे हृदयासाठी (Heart) खूप धोकादायक आहे.अशा वेळी तात्काळ पाऊले उचलणे गरजेचे असते. घाबरू नका, पण काळजी घ्या!
Sakal
मधुमेहावर वेगाने नियंत्रण मिळवण्यासाठी रुग्ण सलग १६ तासांचा उपवास (Fast) करू शकतात.या उपवासात फक्त लिंबूपाणी किंवा ग्रीन टी पिऊ शकता. यामुळे साखर लवकर आटोक्यात येते.
Sakal
सकाळी उठल्यावर लिंबूपाणी किंवा गरम पाणी प्यावे.शरीरातील विषारी घटक (Toxins) काढून टाकण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे आहे.
Sakal
सण-उत्सवांत खाण्या-पिण्याबाबत काळजी घेऊन तुमची औषधे (Medicines) वेळेवर घ्या.जास्त गोड किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळा.
Sakal
दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम (Exercise) करणे गरजेचे आहे.निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकता.
Sakal
रक्तातील साखरेच्या पातळीत लक्षणीय बदल झाल्यास किंवा इन्सुलिनचा डोस (Insulin Dose) घ्यायचा असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही स्व-औषधोपचार (Self-Medication) करू नका.
Sakal
Sakal