पहिल्या जनगणनेनुसार, भारतात किती गरीब लोक राहत होते, आता परिस्थिती काय?

Mansi Khambe

भारतीय जनगणना

धोरण तयार करणे, संसाधन वाटप करणे आणि भारतीय लोकसंख्येची बदलती गतिशीलता समजून घेण्यासाठी देशात १६ वर्षानंतर जनगणना केली जाते.

India first census | ESakal

वेगळी पद्धत

भारतातील शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली असून पुढील जनगणना २०२७ मध्ये होणार आहे.यावेळी सरकार सर्वसाधारण जनगणनेसोबत जातीय जनगणना करणार आहे.

India first census | ESakal

डिजिटल जनगणना

याशिवाय, यावेळी जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केली जाईल. पण स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जनगणना झाली तेव्हा देशाची आर्थिक स्थिती कशी होती आणि त्यावेळी किती गरिबी होती, याबाबत जाणून घ्या.

India first census | ESakal

लोकसंख्येत वाढ

देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाची लोकसंख्या ३४ कोटी होती. आज लोकसंख्या १४० कोटींच्या पुढे गेली आहे, म्हणजेच गेल्या ७८ वर्षांत देशाची लोकसंख्या १०० कोटींहून अधिक वाढली आहे.

India first census | ESakal

देशातील गरिबी

तसेच स्वातंत्र्याच्या वेळी देशातील सुमारे २५ कोटी लोक गरिबीत जगत होते. टक्केवारीनुसार त्यावेळी सुमारे ८० टक्के लोकसंख्या गरिबीत जगत होती.

India first census | ESakal

कशी ठरवली जाते गरिबी?

कोण गरीब आहे आणि कोण नाही याची व्याख्या सरकारने ठरवली आहे. यूपीए सरकारच्या काळात रंगराजन समितीने देशातील गरिबीची व्याख्या केली होती. मात्र यामुळे अनेक वाद झाले होते.

India first census | ESakal

खर्च करणारी व्यक्ती

रंगराजन समितीच्या व्याख्येनुसार, शहरात ४७ रुपयांपेक्षा कमी आणि गावात ३२ रुपयांपेक्षा कमी खर्च करणारी व्यक्ती गरीब आहे.

India first census | ESakal

कमावणारी व्यक्ती

त्याचबरोबर शहरात राहणारा व्यक्ती १००० रुपये कमवत असेल आणि गावात राहणारा व्यक्ती ८१६ रुपये कमवत असेल तर असे लोक दारिद्र्यरेषेखाली येणार नाहीत.

India first census | ESakal

सध्याची आकडेवारी

भारतात सध्या उपलब्ध असलेले गरिबीचे आकडे २०११-१२ चे आहेत आणि त्या आकड्यांनुसार, देशातील २६.९ कोटी लोक गरीब आहेत.

India first census | ESakal

रामायण-महाभारत ग्रंथावरही कॉपीराइट लागतो का? काय आहे कायदा? जाणून घ्या...

Copyright Law | ESakal
येथे क्लिक करा