कार्तिक पुजारी
अनेकांना माहिती नसेल पण महानायक अमिताभ बच्चन हे देखील काही काळ राजकारणात होते.
राजीव गांधी यांच्या विनंतीवरुन त्यांनी १९८४ मध्ये अलाहाबादमधून निवडणूक लढवली होती.
काँग्रेसच्या तिकीटावरुन लढताना त्यांचा या जागेवरुन विजय देखील झाला होता.
अमिताभ यांनी हेमवती नंदन बहुगुणा यांना २ लाख मतांनी पराभव केला होता
पण, त्यावेळी ते चित्रपटांच्या शुटिंगमध्ये खूप व्यस्त होते.
या कारणामुळे त्यांनी १९८७ मध्ये राजकारणातून सन्यास घेतला.
पण, त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन या २००४ पासून आतापर्यंत समाजादी पक्षाकडून राज्यसभा खासदार आहेत.