Sudesh
आपल्यापैकी अनेकांना दुपारी जेवणानंतर वामकुक्षी घेण्याची सवय असते.
महाराष्ट्रातील पुण्याच्या अनेक ओळखींपैकी हीदेखील एक ओळख आहे. असं म्हणतात, की यामुळेच पुण्यातील दुकानं दुपारी एक ते चार बंद असतात.
दुपारी जेवल्यानंतर खूप छान झोप येते. पण दुपारी झोपणं प्रत्येकासाठीच योग्य असतं असं नाही.
आरोग्य तज्ज्ञांच्यामते दुपारी झोपल्यानं पोटाशी संबंधित समस्या गॅस, अपचन याशिवाय लठ्ठपणा, डायबिटीस यांसारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो.
आयुर्वेदात काहीजणांना दुपारी झोपण्याची सवलत दिली आहे. त्यात विद्यार्थी, मजूर, वयस्कर लोक यांचा समावेश आहे.
तज्ज्ञांच्यामते दुपारी पॉवर नॅप घेणे ठीक आहे, परंतु यामुळे रात्री झोप न येण्याची समस्या देखील होऊ शकते.
उन्हाळ्यामध्ये रात्र लहान असल्यामुळे झोप पूर्ण होत नाही. अशा वेळी तुम्ही दुपारी झोप घेऊ शकता, असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
जे लोक सकाळी लवकर दिवसाची सुरूवात करतात त्यांना दुपारी झोपायची आवश्यकता असू शकते. जेणेकरून ताजंतवानं वाटेल.