संतोष कानडे
अकबर हा भारतावर सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या मुघल सम्राटांपैकी एक होता.
२५ ऑक्टोबर १६०५ रोजी अकबरचे निधन झाले. युद्धात नव्हे, तर आजार हे त्याच्या मृत्यूचे कारण होते.
अकबरला जुलाब (dysentery) झाला होता. तो ३ ऑक्टोबरपासून आजारी होता आणि २५ तारखेला त्याचा मृत्यू झाला.
त्या काळातील वैद्यकीय मर्यादांमुळे बादशाहचे प्राण वाचवता आले नाहीत.
अकबरचा मकबरा उत्तर प्रदेशातील सिकंदरा, आग्रा-मथुरा मार्गावर आहे.
अकबरने स्वतःच्या मकबऱ्याचे काम जिवंतपणीच सुरू केले होते.
मकबरा पूर्णपणे १६१३ मध्ये तयार झाला. जहांगीरने उर्वरित काम पूर्ण केले.
ही पाच मजली इमारत संगमरवरी बांधकामाची आहे. तिच्या खालील मजल्यात अकबरची समाधी आहे.
मकबऱ्याच्या चारही बाजूंनी बाग आणि नऊ मेहराबांचे दालन आहे. यमुना नदी एकेकाळी अगदी जवळून वाहत होती!