Aarti Badade
अंबागड किल्ला केवळ लष्करी केंद्र नव्हता, तर स्वातंत्र्य संग्रामाचा जिवंत साक्षीदार होता. आजही त्याचा रुबाब टिकून आहे.
१८१८ मधील लांजी उठावानंतर स्थानिक स्वातंत्र्यसैनिकांनी या किल्ल्यावरून ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष छेडला होता.
किल्ल्याच्या तटबंदी, तुरुंग आणि भग्न वास्तू आजही त्या संघर्षाच्या कथा सांगतात. इथे उभं राहिलं की भूतकाळ जिवंत होतो.
दाट जंगल, अरुंद वाटा आणि निसर्गाच्या कुशीतून जाणारी वाट – अंबागड ट्रेक हा एक साहसप्रद प्रवास आहे.
किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारे हिरवे डोंगर, दऱ्या आणि खुलं आकाश – प्रत्येक क्षण कॅमेरात टिपावा असा!
चिचोली रेल्वे स्थानकापासून केवळ ४.५ किमी अंतरावर. नागपूर विमानतळापासून १०० किमीवर. रस्ता आणि बसची चांगली सोय.
पावसाळा आणि हिवाळा – जुलै ते फेब्रुवारीमध्ये हिरवाई, आल्हाददायक हवामान आणि ट्रेकिंगसाठी उत्तम वेळ!
अंधाळगाव – वस्त्रनिर्मितीसाठी प्रसिद्ध. नागझिरा – जंगलसफारी आणि छायाचित्रणासाठी उत्तम. तुमसर – सांस्कृतिक ठिकाण.
निसर्गरम्य डोंगरात वसलेलं हे मंदिर शांततेसाठी आणि अध्यात्मासाठी आदर्श ठिकाण.
इतिहास, निसर्ग, साहस, आणि शांतता – या सर्वाचा एकत्र अनुभव घ्यायचा असेल, तर एकदातरी अंबागड किल्ला पाहायलाच हवा!