Shubham Banubakode
अमरावतीच्या मेळघाटातील पिली गावात कधीकाळी 500 कुटुंब राहायची आता इथे फक्त एक घर आहे.
Amravati’s Pili Village ( Ai Image )
esakal
गावाच्या उंच डोंगरावर मंदिर दिसतं, मात्र आत देवाची मूर्ती नाही. बाजूलाच मोठी पाण्याची टाकी आहे, पण त्यात पाण्याचा थेंबही नाही.
Amravati’s Pili Village ( Ai Image )
esakal
घनदाट जंगलात आता फक्त प्राणी अन् किड्यांचा किरकिर आवाज ऐकू येतो. संपूर्ण गाव निर्मनुष्य आहे.
Amravati’s Pili Village ( Ai Image )
esakal
२०२१ मध्ये पिली गावाचं पुनर्वसन करण्यात आलं. शेकडो कुटुंबांनी गाव सोडलं, पण भोगीलाल बैठेकर कुटुंब मात्र अजूनही इथेच राहतं.
Amravati’s Pili Village ( Ai Image )
esakal
भोगीलाल बैठेकर सांगतात, “सरकार दहा लाख रुपये देतं, पण त्या पैशात जमीन, घर आणि शेती मिळत नाही. मग गाव का सोडायचं?
Amravati’s Pili Village ( Ai Image )
esakal
ते म्हणतात, “इथे पाणी, लाकूड सगळं मोफत मिळतं. शहरात पैसे द्यावे लागतात. आम्ही गरीब माणसं तिथे जाऊन काय करणार?”
Amravati’s Pili Village ( Ai Image )
esakal
गावात फक्त एकच कुटुंब असलं तरी जीवन थांबलेलं नाही. भोगीलाल स्वतः मुलांना शेजारच्या गावात शाळेत सोडतात आणि शेतीही सांभाळतात.
Amravati’s Pili Village ( Ai Image )
esakal
गावाचा रस्ता बंद करण्यात आला असला तरी बैठेकर कुटुंब अजूनही आपल्या मातीशी घट्ट जोडलेलं आहे.
Amravati’s Pili Village ( Ai Image )
esakal
Cockroach Janta Party Founder Abhijeet Dipke
esakal