आशुतोष मसगौंडे
2008 मध्ये गुजरातमधील मोटेरा येथे आसारामच्या गुरुकुलात शिकणाऱ्या दोन मुलांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यादरम्यान आश्रमातील तंत्र-मंत्रामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप आसाराम यांच्यावर होता.
2009 मध्ये राजू चांडक या व्यक्तीने आसाराम बापूंवर आरोप केला की, आसाराम काळी जादू आणि तंत्र मंत्राद्वारे त्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहेत.
आसारामच्या आश्रमात महिलांचेही लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप राजू चांडक यांनी केला होता.
मध्य प्रदेशातील विदिशामध्ये 2013 साली एका कार्यक्रमात आसारामच्या पाया पडणाऱ्या शिष्याला आसारामने लाथ मारली होती. यानंतर शिष्याने कोर्टात धाव घेतली होती.
प्रकरण 2001 चे आहे, आसारामच्या योग वेदांत समितीने मांगल्य मंदिराजवळ 11 दिवसांसाठी जमीन घेतली. मात्र 11 दिवस उलटूनही जमीन रिकामी करण्यात आली नाही. 700 कोटी रुपयांची ही जमीन 'जयंत व्हिटॅमिन्स लिमिटेड'ची आहे.
2013 मध्ये छिंदवाडा आश्रमात शिकणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने आसाराम बापूनेच तिच्यावर अत्याचार केला असल्याचा आरोप केला होता.
अनेक वर्षे भाविकांच्या मनावर राज्य करणाऱ्या आसारामचे कारनामे समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता.
17 एप्रिल 1941 मध्ये जन्मलेल्या आसारामचा वाढदिवस आहे. 83 वर्षांचा आसाराम सध्या तरुंगात आहे.