Pranali Kodre
वारीतील रिंगण परंपरेत असलेल्या 'बाजीराव विहिरी'चे ऐतिहासिक महत्त्व खूप मोठे आहे.
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात वाखरी परिसरात चार ठिकाणी गोल रिंगण होते. यात बाजीराव विहीर खूप खास आहे.
वाखरी हे आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावरील शेवटचे गाव आहे. येथे उभे आणि गोल रिंगण खूप मोठ्या प्रमाणात होते.
सुमारे २०० वर्षांपूर्वी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी ही चिरेबंद दगडी आयताकृती विहीर वाखरीजवळ बांधली.
बाजीराव पेशवे स्वतः ११ वर्षे पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांनी वारकऱ्यांच्या सोयीसाठी ही विहीर बांधली.
पेशव्यांनी सरदार खाजगीवाले यांच्याकडून १५ बिघे जमीन आणि विहीर विकत घेतली. ती त्यांनी विठोबा मंदिराला अर्पण केली.
विठोबाला रोज लागणाऱ्या तुळशी आणि फुलांची शेती या विहिरीच्या पाण्यावर व्हावी, अशी बाजीरावांची कल्पना होती.
या महत्त्वाच्या व्यवहारात पेशव्यांनी जमिनीसाठी आणि विहिरीसाठी स्वतंत्रपणे ४०० रुपये दिले होते.
वारीच्या मार्गावरील हे ऐतिहासिक ठिकाण आजही वारकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र आहे.