भारताने कितीवेळा जिंकलाय आशिया कप?

Pranali Kodre

आशिया कप २०२५

आशिया कप २०२५ स्पर्धा ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे खेळवली जाणार आहे.

Asia Cup Trophy Winners | Sakal

१७ वी आशिया कप स्पर्धा

यंदा टी२० स्परुपात ही स्पर्धा होणार आहे. आत्तापर्यंत १६ वेळा आशिया कप स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले असून यंदाची १७ वी स्पर्धा असेल.

Team India | Sakal

स्पर्धेचे बदलते स्वरुप

१९८४ साली सुरू झालेल्या या स्पर्धेत आधी वनडे स्वरुपात स्पर्धा होत होत्या. पण गेल्या काही वर्षांपासून आगामी आयसीसी स्पर्धांच्या दृष्टीने कधी वनडे, तर कधी टी२० स्वरुपात ही स्पर्धा होते.

Asia Cup Trophy Winners | Sakal

म्हणून टी२० प्रकारात स्पर्धा

२०२६ मध्ये टी२० वर्ल्ड कप होणार असल्याने यंदा टी२० प्रकारात आशिया कप २०२५ स्पर्धा आशिया खंडातील ८ देशात खेळवली जात आहे.

Sri Lanka | Sakal

भारत सर्वाधिक वेळा विजेता

आत्तापर्यंत भारताने सर्वाधिक ८ वेळा आशिया कप स्पर्धा जिंकली आहे. भारताने १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६, २०१८ आणि २०२३ साली विजेतेपद मिळवले आहे.

Team India | Sakal

श्रीलंकाही यशस्वी

भारतापाठोपाठ श्रीलंकेने सहावेळा ही स्पर्धा जिंकली. श्रीलंकेने १९८६, १९९७, २००४, २००८, २०१४ आणि २०२२ मध्ये ही स्पर्धा जिंकली.

Sri Lanka | Sakal

पाकिस्तानला दोनदा विजेतेपद

पाकिस्तानने दोनवेळा आशिया कप जिंकला आहे. त्यांनी २००० आणि २०१२ साली ही स्पर्धा जिंकली.

Pakistan | Sakal

श्रेयस अय्यर पुन्हा दुर्लक्षित ते गिल उपकर्णधार; भारतीय संघ निवडीचे ५ मुख्य मुद्दे

Shubman Gill - Shreyas Iyer | Sakal
येथे क्लिक करा