कार्तिक पुजारी
ममता या भाजपचा कट्टर विरोध करत असल्या तरी त्या कधीकाळी एनडीए सरकारमध्ये मंत्री देखील राहिल्या आहेत.
२००१ मध्ये तहलका मॅगझीनने कारगील शहिदांच्या शवपेट्या प्रकरणी स्टिंग ऑपरेशन केलं होतं. त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस संरक्षणमंत्री होते.
ममतांनी त्यांना राजीनामा मागितला होता. फर्नांडिंस यांना राजीनामा द्यावा लागला.
१७ दिवस रेल्वेमंत्री राहिल्यानंतर ममतांनी देखील राजीनामा दिला. त्या एनडीएतून बाहेर पडल्या.
वाजपेयींनी ममतांना आपला राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. ममतांनी याला नकार दिला.
वाजपेयींनी देखील हट्ट केला, की जोपर्यंत त्या मंत्रिमंडळात सहभागी होत नाहीत तोपर्यंत ते उपाशी राहतील
वाजपेयी तीन तास उपाशी राहिले. शेवटी ममतांनी नमतं घेतलं आणि त्या मंत्रिमंडळात सहभागी झाल्या.