औरंगजेबानंतरच मुघल साम्राज्याचा ऱ्हास कसा झाला?

संतोष कानडे

औरंगजेब

1707 साली औरंगजेबचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाला वेग आला.

संघर्ष

त्याच्या उत्तराधिकाऱ्यांमध्ये सत्तेसाठी सतत संघर्ष झाल्याने केंद्रीय सत्ता कमकुवत झाली.

बादशाह

कमकुवत बादशहांमुळे प्रांतांवरील मुघलांचे नियंत्रण हळूहळू कमी होऊ लागले.

प्रभाव

मराठे, शीख, जाट आणि राजपूत यांसारख्या प्रादेशिक शक्तींनी स्वतंत्रपणे आपला प्रभाव वाढवला.

खजिना

दीर्घकालीन युद्धांमुळे मुघलांचा खजिना रिकामा झाला आणि आर्थिक संकट गडद झाले.

नादिरशाह

इ.स. 1739 मध्ये नादिरशाहने दिल्लीवर आक्रमण करून मोठी लूट केली, ज्यामुळे साम्राज्याला मोठा धक्का बसला.

अब्दाली

त्यानंतर अहमदशाह अब्दालीच्या वारंवार आक्रमणांमुळे मुघलांची लष्करी ताकद आणखी खिळखिळी झाली.

भ्रष्टाचार

दरबारातील भ्रष्टाचार, अंतर्गत मतभेद आणि अकार्यक्षम प्रशासनामुळे साम्राज्याची पकड सैल झाली.

ईस्ट इंडिया

या कमकुवत परिस्थितीचा फायदा घेत ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपला राजकीय प्रभाव वाढवला.

बाहदूर शाह जफर

अखेर 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर शेवटचा मुघल सम्राट बाहदूर शाह जफर याला पदच्युत करून ब्रिटिशांनी मुघल साम्राज्याचा अधिकृत अंत केला.

रात्री भात खाणे योग्य की अयोग्य? आयुर्वेद काय सांगतं?

<strong>येथे क्लिक करा</strong>