संतोष कानडे
आयुर्वेदानुसार रात्रीचे जेवण हलके, ताजे आणि सहज पचणारे असावे.
भात हा पचायला तुलनेने हलका मानला जातो, मात्र त्याचा परिणाम व्यक्तीच्या प्रकृती आणि प्रमाणावर अवलंबून असतो.
रात्री कमी प्रमाणात गरम आणि ताजा भात खाल्ल्यास अनेकांना तो सहज पचू शकतो.
थंड, शिळा किंवा फ्रीजमध्ये ठेवलेला भात रात्री खाणे आयुर्वेदानुसार टाळावे.
भातासोबत मूगडाळ, तूप आणि पचायला हलक्या भाज्या घेतल्यास पचनास मदत होऊ शकते.
अतिप्रमाणात भात खाल्ल्यास जडपणा आणि अपचनाचा त्रास जाणवू शकतो.
रात्री जेवण करून लगेच झोपणे टाळावे आणि थोडे चालावे.
ज्यांची पचनशक्ती कमी आहे किंवा कफ प्रकृती आहे त्यांनी भाताचे प्रमाण मर्यादित ठेवावे.