सकाळ वृत्तसेवा
औरंगजेब हा क्रूर मुघल शासक होता, हे इतिहासावरुन लक्षात येतंच. परंतु त्याचं लक्ष किती बारीक होतं, हे आता तुमच्या ध्यानात येईल.
औरंगजेब बादशहा हा आपल्या कार्यकाळात केवळ एकदाच काश्मीरला गेलेला होता. तिथलं सौंदर्य त्याला आवडलं.
काश्मीरच्या सौंदर्यासोबत त्याचं लक्ष तीन गोष्टींकडे गेलं. ज्या गोष्टी त्याला इस्लामविरोधी वाटत होत्या.
त्यातली पहिली गोष्ट अशी की, काश्मीरच्या महिला खाली अंतर्वस्त्र घालत नाहीत. ही गोष्ट औरंगजेबाला पटली नाही.
दुसरी गोष्ट, काश्मीरमध्ये अफीमची शेती होते आणि त्याचा वापरदेखील सर्रास केला जातो. ही बाबसुद्धा त्याला रुचली नाही.
तिसरी गोष्ट, काश्मीरमध्ये भांड रंगमंच आणि मूक अभिनय केला जात असे. या बाबी औरंगजेबाला इस्लामविरोधी वाटत होत्या.
औरंगजेबाने तातडीने या तिन्ही गोष्टींवर प्रतिबंध आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मुघलांचं पतन सुरु झालं.
शेवटच्या ४५ वर्षांमध्ये मुघलांनी काश्मीरमध्ये २२ सुभेदार नियुक्त केले होते. त्यामुळे सत्तेला स्थैर्य प्राप्त होऊ शकलं नाही.
हळूहळू काश्मीरवर आफगाणी पठाणांचं वर्चस्व प्रस्थापित होऊ लागलं. आर.के. परिमू यांचं 'ए हिस्ट्री ऑफ मुस्लिम रुल इन काश्मीर' या पुस्तकामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे.