संतोष कानडे
"मी कोण आहे आणि काय केले, हे मलाच समजत नाही," असं औरंगेजब म्हटल्याचे इतिहासात उल्लेख आहेत.
शेवटच्या वेळी औरंगजेब आयुष्याबद्दल व्यथित झाल्याच्या त्याच्या पत्रव्यवहारांवरुन दिसून येतं.
मात्र मृत्यूपूर्वी त्याने मुलगा आझम शाह आणि कामबक्ष यांना भावनिक पत्रे लिहिली होती.
आपल्या आयुष्याबद्दल त्याने खंत, पश्चात्ताप आणि ईश्वराच्या न्यायाची भीती व्यक्त केली होती.
स्वतःच्या कष्टाने मिळालेल्या पैशांतूनच कफन विकत घ्यावा, अशी इच्छाही त्याने व्यक्त केली होती.
साधेपणाने अंत्यसंस्कार करावेत आणि अनावश्यक खर्च टाळावा, अशीही त्याची इच्छा होती.
इतिहासकारांच्या मते, ही पत्रे एका वृद्ध आणि आत्मपरीक्षण करणाऱ्या सम्राटाची मानसिक अवस्था दाखवून देतात
आपण जन्माला येतो रिकाम्या हाताने आणि मरण पावतो तेव्हाही रिकामे हात घेऊनच जातो, असे भाव तो पत्रातून नमूद करतो.