संतोष कानडे
औरंगजेब कट्टर एकेश्वरवादी असल्याने त्याला हिंदू धर्मातील मूर्तीपूजा आणि बहुदेववाद अत्यंत खटकायचा.
९ एप्रिल १६६९ रोजी त्याने एक प्रसिद्ध शाही फरमान काढून हिंदूंची मंदिरे आणि तेथील शैक्षणिक केंद्रे नष्ट करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशाचा पुरावा म्हणून 'मासिर-ए-आलमगिरी' ग्रंथात काशीचे विश्वनाथ मंदिर आणि मथुरेचे केशवदेव मंदिर पाडल्याची अधिकृत नोंद आहे.
हिंदूंचे सण होळी, दिवाळी आणि दसरा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरे होणे त्याला मान्य नव्हते, त्यामुळे १६६५ मध्ये त्याने यावर बंदी घातली.
दिवाळीच्या दिवशी बाजारात किंवा घराबाहेर दिवे लावण्यास मुघल प्रशासनाने औरंगजेबाच्या आदेशानुसार मनाई केली होती.
अकबराने सुरू केलेली आणि हिंदूंच्या 'राजे पूजण्याच्या' परंपरेशी साधर्म्य असणारी 'झरोका दर्शन' ही प्रथा औरंगजेबाने दरबारातून पूर्णपणे बंद केली.
राजपूत राजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी मुघल सम्राटाने स्वतः त्यांच्या कपाळावर विजयाचा 'टिळक' लावण्याची दरबारी परंपरा त्याने थांबवली.
हिंदू भाविक मोठ्या संख्येने एकत्र येऊन पवित्र नद्यांवर स्नान किंवा यात्रा करत, जे रोखण्यासाठी त्याने पुन्हा 'तीर्थयात्रा कर' लावला.
गैर-मुस्लिमांना समान दर्जा देणे अमान्य असल्याने, त्याने १६७९ मध्ये हिंदूंवर पुन्हा 'जिझिया कर' लावून त्यांना दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केला.
या सर्व घटनांचे थेट पुरावे मिर्झा मोहम्मद काझिमच्या 'आलमगीरनामा' आणि साकी मुस्तैद खानच्या 'मासिर-ए-आलमगिरी' या मुघल काळातील अधिकृत इतिहासग्रंथांमध्ये उपलब्ध आहेत.