संतोष कानडे
साखर नैसर्गिकरित्या थंड असल्यामुळे शरीरातील वाढलेले पित्त, छातीतील जळजळ आणि ॲसिडिटी कमी करते.
अतिश्रमामुळे थकवा किंवा ग्लानी आली असल्यास, साखरेचे पाणी शरीराला त्वरित ऊर्जा देऊन थकवा दूर करते.
शरीरात उष्णता वाढून हात-पायांची जळजळ होत असल्यास खडीसाखर खाण्याने शरीराला थंडावा मिळतो.
नाकातून रक्त येणे (नळ सुटणे) अशा रक्तपित्ताच्या त्रासामध्ये खडीसाखर औषधासारखे काम करते.
उत्तम दर्जाची शर्करा शरीरातील धातू वाढवून ताकद आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते.
हे जसे साखरेचे फायदे आयुर्वेदात सांगितलेले आहेत, तसे तोटीही सांगितले आहेत. जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने शरीरात कफ आणि मेद (चरबी) वाढू लागते.
साखरेच्या अतिसेवनामुळे मधुमेह (डायबिटिस), यकृताचे (लिव्हर) आजार आणि पचनक्रिया मंदावण्याचा धोका असतो.
आजकाल बाजारात मिळणारी पांढरी रिफाइंड साखर केमिकल वापरून बनवली जाते, जी शरीराला फक्त आजार देते.
त्यामुळे साखरेचा फायदा हवा असल्यास पांढऱ्या साखरेऐवजी धागा असलेली खडीसाखर, सेंद्रिय गूळ किंवा मध यांचा मर्यादित वापर करावा.
मात्र ज्यांना मधुमेहाचा आजार नाही, त्यांनीच साखर आणि साखरेचे पदार्थ सेवन करावेत. बाकी साखर नाही घेतली तर उत्तमच आहे.