सकाळ वृत्तसेवा
छत्रपतींनंतर हिंदुस्थानात ज्या सेनापतीने इतिहास घडवला, तो म्हणजे बाजीराव पेशवे.
शिवरायांनी स्वराज्य उभं केलं, तर बाजीरावांनी त्या स्वराज्याला हिमालयाच्या दिशेने नेलं.
बाजीराव हे केवळ शूर सेनापती नव्हते, तर उत्तम मुत्सद्दीही होते. युद्धकौशल्य आणि चाणाक्ष डावपेच ही त्यांची खासियत होती.
शिंदे, होळकर, पवार यांसारखे नवे, धाडसी सरदार त्यांनी घडवले — ज्यांनी मराठ्यांच्या ताकदीला चार चांद लावले.
सरदार गब्बर झाले, परंतु स्वतः बाजीराव सावकारांच्या कर्जात राहिले. वैयक्तिक लाभावर त्यांनी तुळशीपत्र ठेवलं.
गिरीधर बहादर, दया बहादर, महमदखान वंगश यांच्यावर विजय मिळवून मुघल साम्राज्याला कोसळण्यास त्यांनी हातभार लावला.
खान डौरान व जयसिंगसारख्या सरदारांशी मैत्री करून त्यांनी त्यांना आपल्या राजकारणात गुंतवून ठेवले.
नादिरशहाच्या आक्रमणानंतर दिल्ली मराठ्यांच्या ताब्यात येऊ शकली असती. पण शाहू महाराजांच्या धोरणाचा मान राखून बाजीरावांनी संयम ठेवला.
इतिहासकार किंकेड म्हणतो: “शूरातला शूर आणि सुंदरातला सुंदर, बाजीराव सर्वांची मनं जिंकतो.”