Shubham Banubakode
घरात दिवा लावणे हे शांती आणि सकारात्मकतेचा प्रतीक आहे. दीपज्योतीमुळे वातावरण दिव्य होते आणि मन प्रसन्न राहतं.
भारतीय ग्रंथानुसार तुपाचा दिवा अत्यंत पवित्र मानला जातो. तुप जाळल्याने घरातील नकारात्मकता निघून जाते व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
महुआ (मोह) तेल दिवा आदिवासी संस्कृतीत विशेष पवित्र मानला जातो. याने घरात पंचतत्त्वांचे संतुलन साधले जाते आणि इश्वराची कृपा मिळते.
तिळाचे तेल अनेक धार्मिक अनुष्ठानांसाठी महत्त्वाचे आहे. दर शनिवार शमीच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यानं नकारात्मक उर्जा दूर होते.
वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजाजवळ रोज मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. हे घरात सुख-शांती आणि समृद्धी आणते.
दक्षिण भारतात खोबऱ्याचं तेल दिव्यासाठी वापरले जाते. हे तेल शुद्धतेचे आणि शांततेचे प्रतीक आहे.
योग्य तेलाचा दिवा लावल्याने घरी सकारात्मकता येते, सुख-समृद्धी वाढते आणि शांतता नांदते.
शनिवार वाडा सगळ्यांनी पाहिलाय पण पेशव्यांचा शुक्रवार वाडा माहिती आहे का?