सकाळ वृत्तसेवा
आज भारताची राष्ट्रभाषा फारसी असती का? हा विचार करायला लावणारा इतिहास आहे.
शिवाजी महाराजांनी आपली मराठी भाषा आणि संस्कृत भाषेला प्रशासनात महत्त्वाचे स्थान दिले.
मुघल, आदिलशाही, निजामशाहीसारखे सत्ताधीश राजकारभार फक्त फारसीतच करत असत.
फारसी भाषा वापरल्यामुळे सामान्य लोक प्रशासनापासून दूर राहिले. त्यामुळे त्यांच्यात अज्ञान आणि गरिबी वाढली.
स्वराज्य स्थापन झाल्यावर शिवाजी महाराजांनी भाषेच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यावर भर दिला.
शिवरायांनी आपल्या राजमुद्रेसाठी संस्कृत भाषा वापरली. पण राज्याचा कारभार त्यांनी मराठी भाषेत सुरू केला.
रघुनाथ पंडित आणि धुंडीराज व्यास यांच्या मदतीने ‘राज्यव्यवहार कोश’ तयार करण्यात आला.
या कोशात ‘वजीर’साठी ‘प्रधान’, ‘दिवाण’साठी ‘सचिव’, आणि ‘अमीर’साठी ‘सेनापती’ असे संस्कृत शब्द सुचवले गेले.
शिवरायांनी पत्रव्यवहार, मेस्तक-लेखन (दस्तावेज लिहिणे) आणि कानुजावतेसाठीही (न्यायालयीन कामांसाठी) मराठीचाच वापर करण्याचा आग्रह धरला.
शिवाजी महाराज नसते, तर आजही फारसी किंवा इंग्रजी हीच राष्ट्रभाषा राहिली असती! मराठीचा अभिमान टिकवून ठेवणारा हा प्रेरणादायी इतिहास आहे.