मुंबईतील जलवाहतुकीसाठी का महत्वाचा आहे भाऊचा धक्का?

Yashwant Kshirsagar

वाहतुकीसाठी महत्वाचे बंदर

भाऊचा धक्का हे बंदर मुंबईच्या पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्यावर असलेला घाट आहे. या बंदरावर रोज अनेक जहाजे येतात, त्यात माल भरला जातो, उतरवला जातो, लोक पण जहाजाने बोटीने प्रवास करतात.

भाऊचा धक्का 175 वर्षांचा

हा धक्का म्हणजे बंदर आता १७५ वर्षाचे झाले आहे असून ते भाऊ अजिंक्य लक्ष्मण यांच्यासह डॉ.भाऊ दाजी लाड यांच्या पुढाकाराने दिग्गजांनी बांधले.

नोकरी सोडून कंपनी स्थापन

भाऊ अजिंक्य लक्ष्मण यांनी इंग्रजांची नोकरी सोडून कंपनी स्थापन केली आणि समुद्रात भराव टाकण्याचे कंत्राट मिळवले.

बंदराची गरज का पडली?

मुंबई बंदरावर उतरताना प्रवाशांचे खूप हाल होतात, प्रवाशी आणि माल वाहतुकीसाठी असं धक्का उभारणं किती गरजेचं आहे हे भाऊंनी पटवून दिलं

बारकाईने अभ्यास

बंदर ऊभारणीसाठी पर्यावरण भरती ओहोटी यांचं बारकाईने अभ्यास करून भाऊनी तो ब्रिटीश राजवटीतील शासनाला सादर केला

चार वर्षांत बंदर पूर्ण

त्याकाळी भाऊंनी दिड लाखाचे कर्ज 6% चक्रवाढ व्याजाने घेतले आणि चार वर्षात बंदर पूर्ण केले.

ब्रिटिशांकडून कामाचे कौतुक

भाऊंच्या कामाचा वेग पाहून हे बंदर भाऊंना ५० वर्षे मक्त्याने ब्रिटीश सरकारने दिले.

आजही 'भाऊचा धक्का'

गव्हर्नर कारनॅक यांचे नाव त्या बंदराला द्यावे असे भाऊंनीच सुचविले होते, ते दिलेही पण आजही ते भाऊचा धक्का म्हणूनच ओळखले जाते.

एका राजपुत्राच्या स्वागतासाठी 'गेट वे ऑफ इंडिया'ची निर्मिती झाली होती

history Gateway of India
येथे क्लिक करा