औरंगजेबाला सळो की पळो करणारे भीमथडी तट्ट कुठून आले ?

सकाळ डिजिटल टीम

अरबी घोड्यांपासून भीमथडी तट्टांपर्यंतचा प्रवास

प्राचीन काळापासून अरबी घोड्यांना सर्वोत्कृष्ट मानले जाते. भारताशी अरबांचा प्रमुख व्यापार हा घोड्यांचा असे. निजामशहा व आदिलशहा हे युद्धासाठी घोडे मध्यपूर्वेतून आयात करत असत.

Bhimthadi Tatta history | sakal

अरबी आणि तुर्की घोड्यांचा संकर – भीमथडी तट्टांची निर्मिती

मध्यपूर्वेतून आलेल्या अरबी आणि तुर्की जातीच्या घोड्यांचा संकर होऊन भीमथडी तट्टांची जात निर्माण झाली. हे घोडे वेगवान, ताकदवान आणि काटक होते.

Bhimthadi Tatta history | Sakal

पुणे जिल्ह्यात भीमथडी तट्टांचा प्रसार

सोळाव्या शतकात पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती आणि इंदापूर भागात हे घोडे मोठ्या प्रमाणावर दिसू लागले. भीमा, नीरा आणि कृष्णा नद्यांचे पाणी त्यांना मानवले.

Bhimthadi Tatta history | Sakal

शिवरायांचा गनिमी काव्यातील मुख्य आधार – भीमथडी तट्ट

छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यासाठी भीमथडी तट्टांचा प्रभावी वापर केला. या वेगवान घोड्यांमुळे मराठ्यांची सेना शत्रूवर अचानक हल्ला करून लगेचच गायब होऊ शकत होती.

Bhimthadi Tatta history | Sakal

भीमथडी तट्टांचे टाप सह्याद्रीत घुमले

मराठ्यांच्या घोडदळाने आदिलशाही संपवली आणि मुघलांना सळो की पळो करून सोडले. सह्याद्रीच्या दगडखोऱ्यात भीमथडी तट्टांचे टाप घुमू लागले.

Bhimthadi Tatta history | sakal

शंभू राजांनी भीमथडी तट्टांच्या संवर्धनावर दिला भर

शिवरायांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराजांनीही या घोड्यांच्या पैदाशीवर विशेष लक्ष दिले. मराठा सैन्य अधिक बलवान करण्यासाठी त्यांनी घोडदळाला प्राधान्य दिले.

Bhimthadi Tatta history | Sakal

संताजी-धनाजींच्या पराक्रमात भीमथडी तट्टांचा वाटा

औरंगजेबाच्या प्रचंड सैन्यावर संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी रात्री-अपरात्री हल्ले चढवले. हे धाडसी पराक्रम वेगवान भीमथडी तट्टांमुळेच शक्य झाले.

Bhimthadi Tatta history | sakal

पेशव्यांच्या काळात उत्तरेतही घोडदळाचा प्रभाव

बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठा घोडदळाने नर्मदा ओलांडली आणि उत्तरेतही मराठ्यांची दहशत निर्माण केली. शिंदे, होळकर, आणि भोसले घराण्यांनीही घोडदळाचा प्रभाव वाढवला.

Bhimthadi Tatta history | Sakal

भीमथडी तट्टांचे ऐतिहासिक महत्त्व

मराठ्यांच्या विजयात त्यांच्या घोडदळाचा मोठा वाटा होता. भीमथडी तट्टांमुळेच मराठ्यांनी अटकेपार विजय मिळवला. म्हणूनच, या घोड्यांची कीर्ती 'भीमथडी तट्ट यमुनेचे पाणी पितात' या म्हणीपर्यंत पोहोचली.

Bhimthadi Tatta history | sakal

'या' गद्दारामुळे शिवरायांची जगदंबा तलवार महाराष्ट्रातून लंडनमध्ये गेली?

chhatrapati shivaji maharaj sword | esakal
येथे क्लिक करा