British Colonialism : काळ्या मिरीच्या व्यापारातून इंग्रजांनी कसा बळकावला भारत? जाणून घ्या ब्रिटिशांच्या राजवटीचा थरारक प्रवास

बाळकृष्ण मधाळे

काळ्या मिरीची ऐतिहासिक कहाणी

काळी मिरीमुळे ज्या देशाला परकीय सत्तेच्या वसाहतीकरणाला (Colonization) सामोरे जावे लागले, तो देश दुसरा-तिसरा कोणी नसून भारत होता.

Why Was Black Pepper Called Black Gold?

|

esakal

भारत : मसाल्यांची भूमी

युरोपियन लोक भारताला ‘मसाल्यांची भूमी’ (Land of Spices) म्हणून ओळखत असत. भारतीय काळ्या मिरीला जगभरात प्रचंड मागणी असल्याने तिला ‘काळे सोने’ (Black Gold) असेही म्हटले जात असे.

Why Was Black Pepper Called Black Gold?

|

esakal

श्रीमंत वर्गाला काळ्या मिरीचे विशेष आकर्षण

प्राचीन आणि मध्ययुगीन काळात युरोपातील श्रीमंत वर्गाला भारतीय काळ्या मिरीचे विशेष आकर्षण होते.

Why Was Black Pepper Called Black Gold?

|

esakal

युरोपमध्ये भारतीय काळ्या मिरीची प्रचंड मागणी

मांस टिकवून ठेवण्यासाठी, तसेच त्याची चव वाढवण्यासाठी मिरीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे. त्यामुळे युरोपमध्ये भारतीय मसाल्यांना मोठी बाजारपेठ निर्माण झाली होती.

Why Was Black Pepper Called Black Gold?

|

esakal

पारंपरिक व्यापारी मार्गांवर तुर्कांचे नियंत्रण

मात्र, तुर्कांनी पारंपरिक भू-व्यापार मार्गांवर नियंत्रण मिळवल्यानंतर युरोपियन व्यापाऱ्यांसमोर भारताशी थेट व्यापार करण्याचे आव्हान उभे राहिले. त्यामुळे भारतातील मसाल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी नवीन सागरी मार्गांचा शोध सुरू केला.

Why Was Black Pepper Called Black Gold?

|

esakal

काळ्या मिरीच्या शोधात वास्को द गामाचा भारतप्रवास

याच प्रयत्नातून पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा १४९८ मध्ये भारताच्या किनाऱ्यावर, म्हणजेच केरळमधील कालिकत येथे पोहोचला. त्यामागे भारतातील मसाले, विशेषतः काळी मिरी आणि त्यातून मिळणारा प्रचंड नफा हे प्रमुख आकर्षण होते.

Why Was Black Pepper Called Black Gold?

|

esakal

मसाल्यांच्या व्यापारासाठी भारताकडे युरोपियनांची धाव

काळ्या मिरीच्या व्यापारातून मिळणाऱ्या मोठ्या आर्थिक फायद्याची जाणीव झाल्यानंतर पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि फ्रेंच व्यापारी भारताकडे आकर्षित झाले. सुरुवातीला त्यांचा उद्देश व्यापार करणे हाच होता.

Why Was Black Pepper Called Black Gold?

|

esakal

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतात प्रवेश

याच पार्श्वभूमीवर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात प्रवेश केला. मसाले आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या व्यापारातून नफा मिळवणे हा तिचा प्रमुख उद्देश होता. मात्र, व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या या कंपनीने पुढे आपला प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली.

Why Was Black Pepper Called Black Gold?

|

esakal

व्यापारातून राजकीय हस्तक्षेपाकडे वाटचाल

भारतातील विविध राजे आणि संस्थानिकांमधील अंतर्गत मतभेदांचा फायदा घेत ब्रिटिशांनी हळूहळू राजकीय हस्तक्षेप वाढवला. व्यापारासाठी उघडलेले दरवाजे पुढे सत्तेच्या विस्ताराचे माध्यम बनले.

Why Was Black Pepper Called Black Gold?

|

esakal

भारतावर ब्रिटिशांचे वर्चस्व कसे वाढले?

ईस्ट इंडिया कंपनीने विविध भारतीय सत्तांमधील संघर्ष आणि मतभेदांचा फायदा घेत आपली राजकीय व लष्करी ताकद वाढवली. हळूहळू कंपनीने भारतातील मोठ्या भूभागावर नियंत्रण प्रस्थापित केले आणि व्यापारासाठी आलेली परकीय कंपनी देशाच्या सत्तेची प्रमुख शक्ती बनली.

Why Was Black Pepper Called Black Gold?

|

esakal

काळ्या मिरीपासून गुलामगिरीपर्यंतचा प्रवास

अशा प्रकारे, काळी मिरी आणि मसाल्यांच्या व्यापारातून सुरू झालेली युरोपियनांची भारतातील उपस्थिती पुढे राजकीय वर्चस्वात बदलली. भारताच्या इतिहासात मसाल्यांच्या व्यापाराची ही कहाणी केवळ आर्थिक महत्त्वाची नसून, पुढे घडलेल्या गुलामगिरीच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरली.

Why Was Black Pepper Called Black Gold?

|

esakal

Why Peacock Dances Before Rain : आकाशात काळे ढग दाटून येताच मोर पिसारा का फुलवतो? यामागचं रंजक कारण तुम्हाला माहीत आहे का?

Why do peacocks dance before rain?

|

esakal

येथे क्लिक करा...