सकाळ वृत्तसेवा
भारतीय लष्करातील सर्वात धाडसी रेजिमेंट. गोरखा जवानांचे शौर्य जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांची लढाईची तयारी, जिगर आणि निष्ठा अद्वितीय आहे.
१८१५ मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने गोरखा रेजिमेंटची स्थापना केली. १९४७ नंतर ही रेजिमेंट भारतीय लष्कराचा अभिन्न भाग बनली.
गोरखा सैनिकांची ओळख म्हणजे त्यांचे खास वक्राकार शस्त्र – खुकरी! लढताना हे शस्त्र प्रभावी आणि घातक हत्यार ठरते.
गोरखा सैनिक ताकद, तंदुरुस्ती आणि लवचिकतेसाठी ओळखले जातात. कठीण परिस्थितीतही लढण्याची त्यांची क्षमता विलक्षण आहे.
गोरखा सैनिक मृत्यूला सामोरे जाण्याचीही तयारी ठेवतात. त्यांचं शौर्य पाहून शत्रूही घाबरतो!
१९६२ भारत-चीन युद्ध, १९७१ भारत-पाक युद्ध आणि कारगिल युद्धात गोरखा रेजिमेंटने निर्णायक भूमिका बजावली.
इतिहासात अनेक वेळा गोरखा सैनिकांच्या लहान गटांनी मोठ्या शत्रू सैन्याचा पराभव केला आहे.
“जय महाकाली, अयो गोरखाली!” – या घोषणेमुळे गोरखा सैनिकांना बळ मिळते आणि शत्रूंच्या मनात भीती निर्माण होते.
गोरखा जवान भारतातच नाही तर नेपाळ आणि ब्रिटीश लष्करातही सेवा देतात. जगभरातील सैन्य दल त्यांच्या शौर्याचे कौतुक करतात.
गोरखा रेजिमेंट म्हणजे शौर्य, निष्ठा आणि वीरता. त्यांचा वारसा आणि योगदान प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा विषय आहे.